
-उमेश बांबरे
सातारा : शासनाने सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी बंधनकारक केलेले असतानाही जिल्ह्यात ८४.७६ टक्केच ई-केवायसी पूर्ण झाली आहे. तब्बल दोन लाख ७१ हजार ९२५ शिधापत्रिकाधारकांची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १७ लाख ८४ हजार ३१० शिधापत्रिकांपैकी केवळ १५ लाख १२ हजार ३८५ शिधापत्रिकाधारकांचेच ई-केवायसी पूर्ण झाले आहे. केवायसी करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पावणेतीन लाख कुटुंबांना स्वस्त धान्यापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.