माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यात स्वस्त धान्यापासून पावणेतीन लाख कुटुंबे राहणार वंचित'; ई-केवायसी अपूर्णचा परिणाम

e-KYC Incomplete: आतापर्यंत जिल्ह्यातील १७ लाख ८४ हजार ३१० शिधापत्रिकांपैकी केवळ १५ लाख १२ हजार ३८५ शिधापत्रिकाधारकांचेच ई-केवायसी पूर्ण झाले आहे. केवायसी करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पावणेतीन लाख कुटुंबांना स्वस्त धान्यापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.
“Ration benefits in Satara blocked – 2.75 lakh families to suffer due to incomplete e-KYC process.”
“Ration benefits in Satara blocked – 2.75 lakh families to suffer due to incomplete e-KYC process.”Sakal
Updated on

-उमेश बांबरे

सातारा : शासनाने सर्व शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी बंधनकारक केलेले असतानाही जिल्ह्यात ८४.७६ टक्केच ई-केवायसी पूर्ण झाली आहे. तब्बल दोन लाख ७१ हजार ९२५ शिधापत्रिकाधारकांची प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १७ लाख ८४ हजार ३१० शिधापत्रिकांपैकी केवळ १५ लाख १२ हजार ३८५ शिधापत्रिकाधारकांचेच ई-केवायसी पूर्ण झाले आहे. केवायसी करण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पावणेतीन लाख कुटुंबांना स्वस्त धान्यापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com