Satara Dams : साताऱ्यातील 'या' 7 धरणांनी गाठला तळ; प्रमुख धरणांत 32 ते 48 टक्के पाणी, कोयनेची काय आहे स्थिती?
सध्या जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ३२ ते ४८ टक्क्यांपर्यंतच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
सातारा : जिल्ह्यात टंचाईच्या (Satara Water Shortage) झळा गंभीर रूप धारण करत असतानाच मोठ्या लोकसंख्येच्या गावात एकदिवसाआड पाणी मिळत आहे. अशातच प्रमुख धरणांत केवळ ३२ ते ४८ टक्केच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे आता यापुढे सिंचन व पिण्यासाठी धरणातून पाणी सोडण्यावर मर्यादा येणार आहेत.
अनेक ठिकाणी नदीपात्र कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई अधिक गडद होणार आहे. त्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने सतर्क होत बहुतांशी धरणांतील (Satara Dams) पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात पाच प्रमुख धरणे असून, या धरणात आता जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे.
आतापर्यंत कण्हेर व उरमोडी धरणातून (Kanher and Urmodi Dam) मोठ्याप्रमाणात पाणी दुष्काळी भागाला सोडले गेले, त्यामुळे खटाव तालुक्याकडे दुर्लक्ष झाल्याने पाणी संघर्ष समिती स्थापन करून याविरोधात आवाज उठवावा लागला आहे, तसेच दुष्काळी तालुक्याबरोबरच सातारा, जावळी, महाबळेश्वर, वाई या तालुक्यांतील दुर्गम भागात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. आगामी महिनाभरात ही टंचाई अधिक तीव्र होणार आहे.
सध्या जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ३२ ते ४८ टक्क्यांपर्यंतच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामध्ये कण्हेर ३७.९२, उरमोडी ३२.५८, धोम बलकवडी ४८.८०, धोम ५४.४८, तारळी ६२.०२ तसेच कोयना धरणात ५८.९५ टक्के पाण्याचा समावेश आहे.
धरणनिहाय पाणीसाठा टीएमसीत..
कोयना ६२.०५
धोम ५.३६
धोम बलकवडी १.८३
कण्हेर ३.८३
उरमोडी ३.२४
तारळी ३.६९
येरळवाडी .०.१२
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.