महात्म्यांच्या नावावर किती दिवस जगणार: अ‍ॅड. रवींद्र पवार

महात्म्यांच्या नावावर किती दिवस जगणार: अ‍ॅड. रवींद्र पवार
Summary

महात्म्यांच्या नावावरच आम्ही किती दिवस जगणार ? आम्ही पुढच्या पिढीसाठी काय करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड. रवींद्र पवार यांनी केले.

कऱ्हाड (सातारा): "अण्णाभाऊ साठे, कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महामानवांनी त्याग केला. त्या त्यागाची फळे आम्ही आज चाखत आहोत. पण महात्म्यांच्या नावावरच आम्ही किती दिवस जगणार ? आम्ही पुढच्या पिढीसाठी काय करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य अ‍ॅड. रवींद्र पवार यांनी केले.

महात्म्यांच्या नावावर किती दिवस जगणार: अ‍ॅड. रवींद्र पवार
कऱ्हाड : उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरा- प्रहार संघटना

दलित महासंघाच्यावतीने कराड अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त गुणगौरव कार्यक्रमात ते दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे अध्यक्षस्थानी होते. समतावादी महिला मंचच्या अध्यक्षा प्रा. पुष्पलता सकटे, प्रकाश वायदंडे ,राम दाभाडे, हरिभाऊ बल्लाळ, मारुती काटरे उपस्थित होते. अ‍ॅड. पवार म्हणाले, "वेदना भोगल्या शिवाय त्या कळत नाहीत. त्याशिवाय क्रांतीही होत नाही. जुन्या काळात अस्पृश्यता मोठ्या प्रमाणात पाळली जात होती. सावली पडली तरी चालत नव्हती. आज परिस्थिती बदलत चालली आहे. त्या तुलनेने आज काहीच त्रास नाही. मग तुम्ही स्वतःला दलित का म्हणून घेता? कारण शोधत बसण्यापेक्षा त्यावर उपाय शोधणे महत्त्वाचे आहे."

महात्म्यांच्या नावावर किती दिवस जगणार: अ‍ॅड. रवींद्र पवार
कऱ्हाड: सरपंच परिषदेची कार्यकारिणी जाहीर

डॉ. सकटे म्हणाले, "दलित म्हणवून घ्यायची आम्हाला काही हौस नाही, पण जातीचे विष जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत दलितत्व राहणारच आहे. आज मागासवर्गीयपण दूर झाले पाहिजे असे बोलले जाते. त्यासाठी काही प्रमाणात प्रयत्नही सुरू आहेत. ते दूर झाले पाहिजे म्हणून एकीकडे सांगितले जात असले तरी दुसऱ्या बाजूला मराठा समाज मात्र आम्हाला मागासवर्गीय करा म्हणून रस्त्यावर उतरतोय. जर मराठा समाज मागासवर्गीय होण्यासाठी तडफडतोय तर मग दलितांचे मागासपण कसे संपणार?." कऱ्हाडचे माजी नगराध्यक्ष अशोकराव भोसले, पोलिस उपाधिक्षक डॉ. रणजीत पाटील, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, सामाजिक कार्यकर्ते सलीम मुजावर, शालन वाघमारे, पत्रकार प्रमोद सुकरे यांना राज्यस्तरीय 'सत्यशोधक अण्णाभाऊ साठे समता पुरस्कार' देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रकाश वायदंडे यांनी प्रास्ताविक केले. रमेश सातपुते यांनी आभार मानले. प्रा. दीपक तडाखे यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com