
वणवे लावल्यामुळे गवत, झाडेझुडपे जळून हवेत प्रदूषण वाढते. वन्यजीव आणि वनसंपदेची मोठी हानी होते. त्यामुळे अशा घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मूठभर लोक स्वार्थासाठी त्याला संपवणार असतील, तर वनसंपदा वाढीसाठी मोहिमा राबवून उपयोग काय? त्यामुळेच त्यांना आता चाप लावण्याची आवश्यकता आहे. ढेबेवाडीजवळ फळबागेत घुसलेला वणवा आटोक्यात आणताना शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यू झाल्याने या प्रश्नाची दाहकता गंभीरपणे पुढे आली आहे.
- संजय शिंदे