
कऱ्हाड : काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोचला आहे, त्यामुळे काँग्रेस कधीही संपू शकत नाही. स्वातंत्र्य मिळविण्यापासून देश प्रगतिपथावर आणण्यापर्यंत काँग्रेसने सत्ताकाळात काम केले आहे. आता देश स्थिर झाल्यानंतर फेक नरेटिव्ह व खोटे आरोप करून भाजप सत्तेवर आली आहे. आज भाजपला सुद्धा त्यांचा पक्ष वाढवायला काँग्रेस कार्यकर्त्यांची व नेत्यांची गरज भासत असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.