
सातारा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार ग्रामपंचायत चोरांबे (ता. जावळी) गावास मिळाला. सहा लाख रुपये व प्रमाणपत्र देऊन गावास गौरविण्यात येणार आहे. द्वितीय पुरस्कार ग्रामपंचायत सुपने (ता. कऱ्हाड) चार लाख रुपये, तृतीय पुरस्कार अंभेरी (ता. खटाव) तीन लाख रुपये जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्रदिनी (ता. १) पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली.