Satara News: 'सततच्या पावसाने सातारा जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल'; सोयाबीन, ज्वारी पडली काळी, भुईमूग, भाताचेही नुकसान

Heavy Rains Wreak Havoc in Satara; जिल्ह्यातील शेतकरी ऊस, भात, सोयाबीन, भुईमूगसह बाजरी, मका, ज्वारी, मूग, नाचणी, तूर, उडीद व अन्य कडधान्यांची पिके मोठ्या प्रमाणावर घेतात. त्याचबरोबर उसाचीही लागण मोठ्या प्रमाणात करतात. खरिपातील पेरणीसाठी दर वर्षी शेतकरी १५ मेनंतर मशागतीच्या मागे लागत असतात.
Waterlogged soybean and jowar fields in Satara after continuous rainfall, leaving farmers distressed.

Waterlogged soybean and jowar fields in Satara after continuous rainfall, leaving farmers distressed.

Sakal

Updated on

-हेमंत पवार

कऱ्हाड : खरिपातील पिके काढणीस आली आहेत. मे महिन्यापापासून सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर महिना संपत आला, तरीही काही पाठ सोडायलाच तयार नाही. शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने काबाडकष्ट करून खरीप हंगामात घेतलेली पिके वादळी पावसाने वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याच्या स्थितीत असल्याने जिल्ह्यातील बळिराजा मात्र हवालदिल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com