

सचिन शिंदे
कऱ्हाड : दुपार झाली, की एखाद्या गावात इतक्या एकरात आग लागली, तेथे वीस एकरांत ऊस जळून खाक झाल्याची बातमी येऊन धडकते. त्यामागचे कारण विजेचा शॉर्टसर्किटचेच ठरलेले असते. त्या आगीत शिवारातील ऊस जळून जातोच, शिवाय शेतकऱ्याची मेहनतही बेचिराख होत आहे. तालुक्यात सहा महिन्यांत तब्बल १५ वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या घटनात ऊस जळून खाक होण्याचे एकरी क्षेत्र अधिक आहे. त्याचे केवळ पंचनामे होत आहेत. त्याचा अहवाल वीज कंपनी, शासनाकडे गेला, तरी शेतकऱ्यांच्या हातात कवडीची मदतही मिळत नाही.