

सातारा : जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत ज्यांना आपले सदस्य संभाळता येत नाहीत, त्यांंनी राजकारणावर चर्चा करू नये. ते सदस्य मनापासून भाजपसोबत आले आहेत. विराज शिंदे कोणाचे, कर्णेताई कोणाच्या? असा प्रश्न करून आमचा प्लॅन ए, बी, सी एक्झिक्युट झाला; पण प्लॅन डी एक्झिक्युट झाला असता, तर वेगळे चित्र दिसले असते, असे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.