
मायणी (जि. सातारा) : पहिल्या हंगामात तयार झालेली साखर राज्यातील पहिल्या तीन क्रमांकाच्या साखरेच्या दर्जाची असून, यंदा साडेसात लक्ष टन उसाचे गाळप करण्यात येईल, असा विश्वास पडळ (ता. खटाव) येथील खटाव माण तालुका ऍग्रो प्रोसेसिंगचे अध्यक्ष व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी व्यक्त केला.
कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाच्या प्रारंभानिमित्त रोलर पूजन झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमास कारखान्याचे को-अध्यक्ष मनोज घोरपडे, कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सर्व संचालक, व्यवस्थापक अशोक नलावडे उपस्थित होते. अनेक अडचणींचा सामना करत कारखान्याने पहिल्याच हंगामात सुमारे साडेतीन लाख टन उसाचे गाळप केल्याचे स्पष्ट करून श्री. घार्गे म्हणाले, ""यावर्षी समाधानकारक पाऊस आहे. कारखाना क्षेत्रातील गावांमध्ये उरमोडी, तारळी, टेंभू व जिहे- कठापूर योजनांच्या माध्यमातून सिंचन क्षेत्र वाढत आहे. त्यामुळे उसाचे क्षेत्रही वाढणार असून, मुबलक ऊस उपलब्ध होईल. निर्धारित केलेले साडेसात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट निश्चितपणे यंदा पूर्ण होईल.'' पहिल्या हंगामात तयार झालेली साखर राज्यातील पहिल्या तीन क्रमाकांच्या कारखान्यांच्या दर्जाची असल्याचेही त्यांनी अभिमानाने स्पष्ट केले.
मनोज घोरपडे म्हणाले, ""असंख्य समस्यांचा सामना करत पहिला गळीत हंगाम यशस्वीपणे पार पाडला. उसाला दरही चांगला दिला. शेतकऱ्यांचे पैसे चुकते केले. यंदा सप्टेंबरअखेर कारखान्याची सर्व मेंटेनन्सची कामे पूर्ण होतील. कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप करण्यात येईल.'' लवकरच डिस्टिलरी प्रकल्प सुरू करण्यात येईल, असे संग्राम घोरपडेंनी स्पष्ट केले. प्रदीप विधाते यांचेही भाषण झाले. अशोक नलावडे यांनी प्रास्ताविक केले. अंजनकुमार घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. अमोल पाटील यांनी आभार केले.
(संपादन ः संजय साळुंखे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.