

Heavy Rain Disrupts Normal Life in Satara; Schools Closed Across Five Talukas
esakal
सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सातारा, पाटण, महाबळेश्वर, जावळी आणि वाई या पाच तालुक्यांतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.