Jihe Kathapur Water Crisis
esakal
सातारारोड : जिहे-कठापूर योजनेच्या मर्यादांचा विचार न करता, पाण्याची उपलब्धता न तपासता आणि धरणातील साठ्याची वास्तविक क्षमता लक्षात न घेता मोठ्या प्रमाणात लाभक्षेत्र वाढवण्यात (jehe kathapur irrigation scheme water crisis) आले. भविष्यात पाण्यावरून मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही परिस्थिती निस्तरण्याची जबाबदारी असलेल्या सत्ताधाऱ्यांनी जर याप्रश्नी तोडगा काढला नाही, तर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी ल्हासुर्णे येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.