

sakal
कऱ्हाड: कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांत मोठ्या प्रमाणात दुबार, तिबार आणि त्यापेक्षाही अधिक वेळा नोंद झालेली नावे आढळली आहेत. या प्रकाराने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यंत्रणेने जर अशा बोगस नोंदींना खतपाणी घातले नसते, तर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नक्कीच वेगळा लागला असता, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.