..त्यासाठी निवडणूक लढवावीच लागेल; राष्ट्रवादीच्या आमदाराचा मोठा निर्णय

NCP MLA Makrand Patil
NCP MLA Makrand Patilesakal
Summary

'त्यांनी' शरद पवारांची भेट घेऊन मदतीची मागणी केली होती; पण..

वाई (सातारा) : भुईंज येथील किसन वीर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Kisan Veer Cooperative Sugar Factory Election) आमदार मकरंद पाटील (Makrand Patil) व जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील (Nitin Patil) यांच्या नेतृत्वाखाली समविचारी व्यक्ती व पक्षांची आघाडी करून लढविण्याचा निर्णय येथील शेतकरी सभासदांच्या मेळाव्यात घेण्यात आला. विद्यमान संचालक मंडळाच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे आज कारखाना बंद असून, कार्यक्षेत्रातील लाखो टन ऊस शिल्लक राहिल्याने ५४ हजार शेतकरी सभासदांचे तसेच कामगारांचे प्रपंच उद्‌ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. पाच तालुक्यांची मातृसंस्था असलेला हा कारखाना वाचविण्यासाठी मार्ग काढावा लागेल. त्यासाठी निवडणूक लढवावीच लागेल. तुम्ही साथ दिली तर शंभर टक्के विजयी होऊ आणि गतवैभव प्राप्त करून देऊ, असा विश्वास आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.

किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील धनश्री मंगल कार्यालयात कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यांतील शेतकरी सभासदांचा विचार मेळावा झाला. या वेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, वसंतराव मानकुमरे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव पवार, बकाजीराव पाटील, बाळासाहेब सोळसकर, उदय कबुले, नितीन भरगुडे-पाटील, शामराव गाढवे, शशिकांत पिसाळ, दिलीप पिसाळ, मदनआप्‍पा भोसले, महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषा गाढवे, चंद्रकांत ढमाळ, मनोज पवार, एस. वाय. पवार, डॉ. नितीन सावंत, तानाजी शिर्के, अमित कदम, रामभाऊ लेंभे, वामनराव जमदाडे उपस्थित होते.

NCP MLA Makrand Patil
पराभवानंतर अखिलेश यादव ॲक्शन मोडमध्ये; चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

आमदार पाटील म्हणाले,‘‘ किसन वीर आबांनी दूरदृष्टी ठेवून स्थापन केलेला हा कारखाना उभारताना अनेक अडचणी आल्या होत्या. त्यावर मात करून १२५० मेट्रिक टनांचा कारखाना सुरू केला. धोम धरणामुळे उसाचे क्षेत्र वाढले. त्यामुळे तात्यांच्या काळात चार हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेपर्यंत विस्तार करण्यात आला. अवघ्या साडेसहा कोटींचे रेग्युलर कर्ज व ७ लाख ३० हजार साखरेची पोती शिल्लक असलेला कारखाना शेवटचा ५० रुपयांचा हप्ता देता न आल्याने तुम्ही कारखाना विरोधकांच्या ताब्यात दिला. त्यावेळी शेतकरी संघटना आंदोलने करत होती. तात्यांनी एकाकी लढत दिली. परंतु, अपयश आले. आज ९५० कोटींचा कर्जांचा बोजा, मागील हंगामातील उसाची बिले मिळाली नाहीत. कामगारांचे २२ महिन्यांचे पगार दिले नाहीत. बँकांनी जप्ती आणली आहे. कुठलीही बँक आज कारखान्यास कर्जे देऊ शकत नाही. अशी भयानक परिस्थिती असताना शेतकरी संघटना व सभासद शांत आहेत. कोणीही आंदोलन केले नाही.

NCP MLA Makrand Patil
Political News : शिवपाल यादव 'सपा'सोबतची युती तोडणार?

आम्ही जीव तोडून सांगत होतो. कारखाना अडचणीत आहे. त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन मदतीची मागणी केली होती. मात्र, त्यांनी नाकारली. विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खोडसाळपणे प्रश्न विचारण्यास भाग पाडले. राज्य सरकार मदत करीत नाही, असा कांगावा विरोधक करीत आहेत. मागील हंगामातच कारखाना बंद पडला असता. परंतु, आघाडी सरकारने ३३ कोटी थकहमी दिल्याने कारखाना उशिरा का होईना सुरू झाला. त्यावेळी आम्ही मनात आणले असते तर एक छदामही कारखान्याला मिळू दिला नसता. थकहमीचे २२ कोटी शासनास परत न केल्याने कारखाना बंद पडला आहे. जिल्ह्याच्या राजकारणाचे वैभव म्हणून ओळखला जाणारा व किसन वीर आबांचे नाव असलेला हा कारखाना काही झाले तरी वाचला पाहिजे. तुम्ही साथ दिली तर शंभर टक्के निवडणूक लढवून यशस्वी होऊ. अवधी कमी असल्याने महत्त्‍वाच्या कार्यकर्त्यांनी अर्ज भरून ठेवावेत. जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करून अंतिम निवड करण्यात येईल.’’

NCP MLA Makrand Patil
पंजाबात 'आप'चं सरकार स्थापन होताच केंद्राचा नवा नियम; अमित शहांची घोषणा

नितीन पाटील यांनी कारखान्याच्या आर्थिक स्थितीचा सखोल आढावा घेऊन कारखान्याची निवडणूक लढणे व जिंकणे सोपे आहे. परंतु, तो चालविणे कठीण आहे. विद्यमान संचालक मंडळाच्या आर्थिक घोटाळा व चुकीच्या व्यवस्थापनामुळे कारखाना १३५ कोटी तोट्यात असून, त्यातच प्रतापगड कारखाना चालविण्यास घेतला आणि खंडाळा कारखान्याची उभारणी केली. त्यामुळे हजार कोटींचा कर्जांचा बोजा झाला आहे. दरवर्षी ५५ कोटी रुपये व्याजाचा बोजा वाढत आहे. मालमत्ता केवळ ७५० कोटींची आहे. त्यावर बँकेने जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. यापूर्वी हीच परिस्थिती होती. त्यामुळे निवडणूक लढविली नाही. कारखाना कसा सुरू करायचा, हाच खरा प्रश्न आहे. नवीन कारखाना उभारायचा म्हटले तर नियमानुसार २५ किमी. क्षेत्राच्या अटीमुळे ते शक्य नाही. हा कारखाना वाचविण्यासाठी शंभर ते दीडशे कोटी भागभांडवल उभे करावे लागेल. त्यासाठी सभासदांनी योगदान दिले तरच कारखाना सुरू होऊ शकतो, असे स्पष्ट केले. या वेळी सदाशिव सपकाळ, नितीन भरगुडे, वसंतराव मानकुमरे, प्रतापराव पवार, बाळासाहेब सोळसकर, शशिकांत पिसाळ यांची भाषणे झाली. अजय भोसले, ॲड. सचिन गायकवाड, बाजीराव महांगडे, अशोकराव पवार, अजय वांगडे, अतुल जाधव, राजेंद्र गाढवे यांनी कारखाना वाचविण्यासाठी निवडणूक लढवावी, अशी सूचना केली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र पुजारी यांनी आभार मानले. या वेळी वाई, खंडाळा, जावळी, कोरेगाव, सातारा या पाच तालुक्यांतील प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी सभासद उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com