.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कऱ्हाड - कोयना धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांकडे पोचत असल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरण व्यवस्थापनाने विसर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी (ता. ८) सायंकाळी सहा वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन वरून एक फुटापर्यंत खाली आणण्यात येणार आहेत. त्यातून ६ हजार ३४८ क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.