Landslide
Landslideesakal

मरण उशाला घेऊन आणखी किती पावसाळे काढायचे?; ग्रामस्थांचा संतप्त सवाल

तारळे (सातारा) : भूस्खलनाच्या (Landslide) दाट छायेत अडकलेले म्हारवंड गाव (Mharwand village) गेली काही वर्षे कायमस्वरूपी पुनर्वसनाचा टाहो फोडत आहे. दरवर्षी पावसाळ्यात (Heavy Rain) येथील लोकांना जागून रात्री काढाव्या लागत आहेत. मरण उशाला घेऊन आणखी किती पावसाळे काढायचे? एखादी काळरात्र ठरल्यावरच लोकप्रतिनिधी, अधिकारी जागे होणार का? हा आर्त सवाल म्हारवंडकर विचारताहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव दोन वर्षांपासून शासनाकडे धूळखात पडला आहे. त्याकडे कोणी लक्ष देईल का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला आहे. (Landslide Threat To Mharwand Village Satara Marathi News)

Summary

अतिदुर्गम म्हारवंडमध्ये ८८ कुटुंबांतील सुमारे ५०० लोक वास्तव्यास आहे. कड्याखाली असलेले हे गाव धो-धो पडणाऱ्या पावसात कधी गडप होईल, सांगता येत नाही.

अतिदुर्गम म्हारवंडमध्ये ८८ कुटुंबांतील सुमारे ५०० लोक वास्तव्यास आहे. कड्याखाली असलेले हे गाव धो-धो पडणाऱ्या पावसात कधी गडप होईल, सांगता येत नाही. पावसाळ्यात येथील थरार जीवघेणा ठरतो. सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस आबालवृध्दांचा थरकाप उडवतो. हे थरारनाट्य एकदाचे थांबावे म्हणून ग्रामस्थ आक्रोश करत आहेत. मागील आठवड्यात मुसळधार पावसात कड्याचे भूस्खलन होऊन माती व पाण्याचे लोट तेथील लोकांच्या घरात व शेतात घुसले. रात्रभर जागून लोकांनी घरातील पाणी व राडारोडा बाहेर काढला.

Landslide
1880 काळातील वटवृक्षाची आजही केली जाते पूजा

शेतीचे (Farm) प्रचंड नुकसान झाले असून, लोकांचे मनोधैर्य खचू लागले आहे. भूस्खलनाच्या भीतीने माणसे गर्भगळीत झाली आहेत. गृहराज्य (Minister Shambhuraj Desai) यांनी सर्व अधिकाऱ्यांसोबत म्हारवंड गाठले. ग्रामस्थांना पुनर्वसनाचे आश्वासन दिले. लोकांचे सांत्वन करून धीर दिला. मात्र, नेमके पुनर्वसन कधी होणार, याबाबत स्पष्टता झाली नाही. दोन वर्षे झाले ८८ कुटुंबांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. तो धूळखात का पडला आहे. पावसाळ्यात येथील भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर भेटी होतात, फोटो काढले जातात, दिलेली आश्वासने पावसाच्या पाण्यात विरतात.

Landslide
रंग बदलण्याचे धाडसही महाविकास सरकारमध्येच : ठाकरेंचा दुजाेरा

आमदार देसाई मंत्री असताना पुनर्वसन लालफितीत कसे?

आता तर आमदार देसाई हे मंत्री आहेत. तरीही पुनर्वसनाचा प्रस्ताव लालफितीत अडकून कसा पडला आहे, याचे कोडे लोकांना पडले आहे. पावसाळ्यात होणाऱ्या जिवांची तगमग थांबणार कधी? दोन वर्षांपासून प्रस्तावावरील धूळ आतातरी झटकणार का? मृत्यूच्या दाढेतून म्हारवंडकरांची खरंच सुटका होणार का? असे अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. येथील भोळीभाबडी जनता पुनर्वसनाच्या आशेवर जगत आहे, ते पावसाळ्यात रोजचं मरण अनुभवत आहेत.

Landslide Threat To Mharwand Village Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com