

ढेबेवाडी : रब्बीचा हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने विविध जिल्ह्यांतून मेंढरांचे कळप या परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. शिवारात मेंढरांच्या कळपांचा मुक्काम असलेल्या ठिकाणी बिबट्याचा वावर वाढल्याने मेंढपाळ चिंतेत असून, मालदन नजीकच्या शिवारात रात्रीच्या सुमारास कळपाजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपातील घोड्याला जखमी करून शिंगरू पळवून नेल्याची घटना नुकतीच घडल्याने मेंढपाळांची चिंता वाढली आहे.