Loksabha Election : सातारा लोकसभेसाठी भाजपने 'या' नेत्याला तिकीट द्यावं; रामदास आठवलेंनी नावंच केलं जाहीर

आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती ४५ जागा जिंकेल, असा दावा करून देशात चारशे पारचा नारा मोदीजींनी दिला आहे.
Ramdas athawale statement about lok sabha election nashik news
Ramdas athawale statement about lok sabha election nashik newsEsakal
Summary

राहुल गांधी यांनी देश जोडण्याऐवजी स्वत:चा पक्ष जोडण्याचे काम करावे. देशभर फिरून त्यांना काहीही फायदा होणार नाही.

सातारा : मराठा समाजाला (Maratha Community) सरकारने दहा टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे त्यांच्या आरक्षणाचा विषय क्लिअर झाला आहे. त्यामुळे मनोज जरांगे- पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी आंदोलनाची भाषा करू नये. शांततेने मराठा समाजाचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केली. सातारा लोकसभेसाठी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना भाजपकडून तिकीट मिळावे, अशी आपली अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

चर्मकार समाजाच्या पश्चिम महाराष्ट्राच्या वधूवर मेळाव्यासाठी केंद्रीय मंत्री आठवले काल साताऱ्यात आले होते. या वेळी त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी रिपब्लिकन पक्षाचे (Republican Party) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, अण्णा वायदंडे आदी उपस्थित होते.

Ramdas athawale statement about lok sabha election nashik news
महायुती की महाविकास आघाडी? राजू शेट्टींनी घेतला मोठा निर्णय; म्हणाले, शिवरायांनी शिकवलेल्या गनिमीकाव्याने..

मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) मंत्री आठवले म्हणाले, ‘‘मराठा समाजाला सरकारने दहा टक्के आरक्षण दिले आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे गती आली होती; पण सरकार आरक्षण देणार होते. आता विषय क्लिअर झाला आहे. त्यामुळे मनोज जरांगेंनी आंदोलनाची भाषा करू नये, शांततेने मराठा समाजाचे नेतृत्व करावे, ही आमची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाविरोधात याचिका दाखल झाली असली, तरी सरकारने निर्णय घेतला आहे. लोकशाहीत सरकारला अधिकार आहे. हे आरक्षण सगळ्यांना नसून आठ लाखांच्या आत उत्पन्न असलेल्यांना आहे. ओबीसींनाही तसेच आरक्षण आहे. न्यायालयात आमच्या सरकारच्या बाजूने चांगली बाजू मांडली जाईल. त्यामुळे टिकणारे आरक्षण मिळेल, यात शंका नाही.’’

Ramdas athawale statement about lok sabha election nashik news
Loksabha Election : 'पत्ते पिसलेले आहेत, त्यातील हुकमी एक्का आमच्याकडे आहे'; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं सूचक विधान

आगामी लोकसभा निवडणुकीत महायुती ४५ जागा जिंकेल, असा दावा करून देशात चारशे पारचा नारा मोदीजींनी दिला आहे; पण काँग्रेसला चाळीस जागाही मिळणार नाहीत, अशी टीकाही मंत्री आठवले यांनी केली. सातारा लोकसभेसाठी कोणाला उमेदवारी मिळेल, या प्रश्नावर मंत्री आठवले म्हणाले, ‘‘खासदार उदयनराजे भोसले हे येथील खासदार आहेत. त्यांना भाजपकडून तिकीट मिळावे, अशी अपेक्षा आहे; पण महायुतीत ज्यांना कोणाला तिकीट मिळेल त्यांचे काम आम्ही करू.’’

पालकमंत्र्यांनी रिपाइंला लक्षात ठेवावे

जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्यांच्या निवडीत रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संधी मिळालेली नाही. त्यांची नावे यादीत नव्हती. याबाबत मंत्री आठवले यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व लक्षात ठेवावे. नियोजन समितीवर पदाधिकाऱ्यांना संधी द्यावी. आमच्या पक्षाकडून जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांचे नाव यादीत यावे, अशी सूचना त्यांनी केली.

Ramdas athawale statement about lok sabha election nashik news
धैर्यशील मानेंचा पत्ता कट? हातकणंगलेतून कोरेंसाठी चाचपणी; फडणवीसांसोबतच्या चर्चेनंतर जोरदार हालचाली

राहुल गांधींनी पक्ष जोडावा

सध्या काँग्रेस पक्षातून अनेक दिग्गज मंडळी बाहेर पडत आहेत. नुकताच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आसाममधील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी देश जोडण्याऐवजी स्वत:चा पक्ष जोडण्याचे काम करावे. देशभर फिरून त्यांना काहीही फायदा होणार नाही. सध्या एनडीएला चांगला प्रतिसाद मिळत असून, देश गतीने पुढे जात आहे. काँग्रेसच्या काळात देशाचा गतीने विकास झाला नाही, अशी टीकाही मंत्री आठवले यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com