Shambhuraj Desai: धरणातील विसर्गाचे काटेकोर नियोजन करा: पालकमंत्री शंभूराज देसाई; अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिवृष्टी काळात मुख्यालय सोडू नये

Maharashtra Flood Management: ‘‘कोणत्याही स्थितीत पावसाचा जोर वाढला, तरी परिस्थिती गंभीर होऊ नये, यासाठी धरण व्यवस्थापनाने विसर्गाचे नियोजन करावे. पावसाचा वाढता जोर पाहता नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहावे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी. जिल्हा परिषदेने ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा.
Minister Shambhuraj Desai
Minister Shambhuraj Desai sakal
Updated on

सातारा: कोयना धरणासह जिल्ह्यातील विविध प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा वाढता जोर लक्षात घेऊन धरणातून विसर्ग वाढविला जात आहे. त्यामुळे या वाढत्या विसर्गामुळे बाधित होणाऱ्या लोकांना आवश्यकता भासल्यास स्थलांतरित करण्यासाठी यंत्रणांनी तयारी ठेवावी. जलसंपदा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या धरण कार्यस्थळावर थांबावे. कोणत्याही स्थितीत लोकांची गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे. कोणीही मुख्यालय सोडू नये, अशी सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com