Irrigation Water Charges : निसर्गाची अवकृपा, त्यात सरकारचा दणका! सिंचनाच्या पाणीपट्टीत तब्बल 10 पट वाढ; धरणातील पाण्यासाठी शेतकऱ्यांना वर्षाला मोजावे लागणार 14,250 रुपये

Maharashtra irrigation water charges 2026 : महाराष्ट्रात जुलै २०२६ पासून सिंचनासाठी धरणाच्या पाण्यावरील जलशुल्कात मोठी वाढ होणार असून हेक्टरी १४,२५० रुपये शुल्कामुळे ऊस, भाजीपाला व नगदी पिकांच्या शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढणार आहे.
Maharashtra irrigation water charges for farmers

Maharashtra irrigation water charges for farmers

esakal

Updated on

कराड (सातारा) : शेतीसाठी धरणातील पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना आता सिंचनासाठी दहापटीहून अधिक जादा पाणी वापर शुल्क भरावे लागणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने एक जुलै २०२६ ते ३० जून २०२९ या कालावधीसाठी ठोक जलशुल्क निर्धारण कार्यवाही सुरू केली (Farmers irrigation water fee hike Maharashtra) आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, अनियमित पाऊस, मजुरीचे वाढते दर आणि शेतीमालाला मिळणारा अस्थिर भाव या समस्यांना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांवर या निर्णयामुळे आणखी आर्थिक भार पडणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com