
कऱ्हाड: सततचा तोटा, कामातील दिरंगाई आणि नावीन्यपूर्ण उपक्रमशीलतेचा अभाव असणाऱ्या एसटी महामंडळातील काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना नारळ दिला जाण्याची शक्यता असून, त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवारच असणार आहे. एसटी प्रशासनाने त्यासंदर्भातील कार्यवाही सुरू केली आहे. अनंत चतुर्दशीनंतर एसटी महामंडळाच्या वरिष्ठ प्रशासनात मोठे बदल होण्याची शक्यता असून, अनेक अकार्यक्षम अधिकाऱ्यांना वगळून त्याठिकाणी नव्या अधिकाऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.