

Lakhs of Litres Wasted from Tarli; Crop Damage Sparks Farmers’ Anger
sakal
-यशवंतदत्त बेंद्रे
तारळे : तारळी धरणाच्या उपसा सिंचन योजनेच्या चाचणीदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे डोंगराकडील डिस्चार्ज चेंबरमधून मोठ्या प्रमाणात पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. या अनियंत्रित पाण्याच्या प्रवाहामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींचे नुकसान झाले आहे. जबाबदारांवर कारवाईची मागणी होत आहे.