

Inspiring Journey: Rani Sawant Leaves Mumbai Life to Succeed in Livestock Farming
sakal
-रूपेश कदम
लग्न करून मुंबईला गेल्यावर काही वर्षांनी मुंबईत संसाराचा गाडा हाकणं जिकिरीचं बनलं. इथं आपलं अन् लेकराबाळांचं हाल होणार हे लक्षात येताच घरधन्याला विश्वासात घेऊन गावाकडं परतण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरविताना एकेकाळची मुंबईकरीन प्रयोगशील पशुपालक शेतकरीण बनली. अशी ही यशोगाथा आहे माण तालुक्यातील कुळकजाई येथील कळसकरवाडीच्या राणी विनोद सावंत यांची.