
सातारा : सातारा ते मुंबईदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांकडून वेगमर्यादेचे वारंवार उल्लंघन होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी अपघाताच्या ठिकाणी महामार्गावर नव्याने १९ ठिकाणी ओव्हरस्पीड कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.