पाटण : पाटणमध्ये पाच हजार मजुरांची उपासमार

अपप्रवृत्तींच्या त्रासाने वीटभट्टी व्यावसायिक व्यवसाय बंद करण्याच्या मन:स्थितीत
वीटभट्टी व्यवसाय
वीटभट्टी व्यवसायsakal

पाटण: वीटभट्टी व्यवसायासाठी कर्ज काढून भांडवल उभे करायचे, जादा दराने लाल माती खरेदी करायची, शासनाच्या जाचक अटींची पूर्तता करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता आणि हेलपाटे मारायचे, मजुरांना सहा महिने अगोदर उचल द्यायची, अशा दिव्यातून गेल्यानंतर वीटभट्टी व्यवसाय उभा रहातो. मात्र, या व्यावसायिकांना कोणताही अधिकार नसणाऱ्या काही अपप्रवृत्ती नाहक त्रास देऊन आर्थिक शोषण करू लागल्या आहेत. वीटभट्टी व्यावसायिकांना वेठीस धरणाऱ्या प्रवृत्तींचा बंदोबस्त झाला नाही तर पाच हजार मजुरांना रोजगार पुरविणारा हा व्यवसाय धोक्यात येणार आहे.

वीटभट्टी व्यवसाय
Satara : सोसायटी निवडणुकीत महाविकास आघाडीचं जबरदस्त वर्चस्व

नदीकाठावरील सखल भागातील बागायती क्षेत्र असलेल्या गावांचा अपवाद वगळता इतर डोंगर उतारावरील व पठारावरील गावातील शेती मॉन्सूनवर अवलंबून आहे. जिरायती शेती करणारा अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर यांना वीटभट्टी व्यवसायामुळे चार महिने खात्रीचा रोजगार मिळतो. आठवड्याची मजुरी मिळाली की स्थानिक बाजारपेठेतील व्यापारी वर्गात उलाढाल होते. मजूर आणि छोटे- मोठे व्यावसायिकांना काही महिने या व्यवसायाचा फायदा होतो. यासाठी वीटभट्टी व्यावसायिक कर्ज काढून भांडवल उभे करणे, जादा दराने लाल माती खरेदी करणे, शासनाच्या जाचक अटींची पूर्तता करून परवानगी घेणे, मजुरांना सहा महिने अगोदर उचल देणे या प्रक्रियेत व पूर्वतयारी करीत असतो. अनेक वर्षे गुण्यागोविंदाने चाललेल्या व्यवसायात तीन वर्षांपासून अपप्रवृत्ती घुसून कमी कालावधीत पैसे कमविण्यासाठी शिरलेल्या दिसत आहेत. कोणताही अधिकार नसताना उत्खनन चालले असेल तेथे जाऊन

वीटभट्टी व्यवसाय
Satara : शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामभाऊ रैनाक यांचं कऱ्हाडात निधन

प्रशासनाने खंबीरपणे चौकशी करणे गरजेचे

वीटभट्टी व्यावसायिकांकडून कायद्याचा धाक दाखवून रोख रक्कम उकळली असल्याच्या चर्चा दबक्या आवाजात सुरू आहेत. काही महाभागांनी व्यावसायिकांकडून ऑनलाइन पद्धतीने फोन पे, गुगल पेच्या माध्यमातून कमाई केली आहे. प्रशासनाने खंबीरपणे यांची चौकशी केली तर खरे चित्र समाजासमोर येईल. तसे नाही झाले तर मात्र या व्यावसायाला घरघर लागणार आहे.

वीटभट्टी व्यवसायामुळे भूमिहीन शेतमजुरांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पाच महिने होतो. जादा मनुष्य बळाला वीटभट्टी व्यवसाय रोजगार पुरविते. वीटभट्टी व्यावसायिकांना वेठीस धरणाऱ्या प्रवृत्तींचा बंदोबस्त झाला नाही, तर पाच ते सहा हजार मजुरांना रोजगाराला मुकावे लागणार आहे.

- संजय जाधव, वीटभट्टी मजूर, अडूळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com