

Ramraje Naik-Nimbalkar Criticizes Declining Political Standards
sakal
फलटण : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर जे घडले ते पाहिल्यानंतर सत्तेसाठी कोण काय करेल, राजकारण कोणत्या स्तराला जाईल, हे सांगता येणार नाही. मतांसाठी दोन- पाच हजार घेऊन भाळलात तर सर्वांचेच नुकसान होणार आहे, त्याचा विचार करून आपले व आपल्या भागाच्या भवितव्यासाठी तरुणांनी जागरूकतेने आणि निर्धाराने पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट प्रतिपादन आमदार रामराजे नाईक- निंबाळकर यांनी केले.