

Government Directs Immediate Restoration of Electricity for Agricultural Pumping
sakal
काशीळ : जिल्ह्यातील कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांवर लागू करण्यात आलेली उपसा सिंचन बंदी अखेर २६ जूनपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून पिकांच्या पाण्यासाठी चिंतेत असलेल्या शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून, शेती पिकांचे होणारे नुकसान आता टळणार आहे. या बंदी उठवण्यावरून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि शेतकरी संघटना या दोन्ही बाजूंनी आपापल्या प्रयत्नांना यश आल्याचा दावा केला आहे.