

-सुर्यकांत पवार
कास : नवीन महाबळेश्वर प्रकल्प करत असताना शासनाने खासगी जमिनींवर टाकलेले आरक्षण रद्द करावे, अशी मागणी जावळी तालुक्यातील अनेक गावांमधील शेतकऱ्यांनी केली. मेढा येथील पंचायत समितीच्या सभागृहात नवीन महाबळेश्वरच्या आराखड्यावरील हरकती व सूचना यांच्यावर आज सुनावणी झाली.