

Railway Fencing Along Pune Miraj Route Creates Farm Road Crisis for 45 Villages in Karad Taluka
sakal
-अमोल जाधव
शेणोली: पुणे- मिरज लाेहमार्गावर दोन्ही बाजूने कुंपण उभारण्याचे काम मध्य रेल्वेकडून सध्या सुरू आहे. रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी कुंपण बांधणीचे प्रयोजन असले, तरी त्यामुळे शेतरस्त्याची अडवणूकच होत असल्याने ही समस्या शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणार आहे. कऱ्हाड तालुक्यातील ४५ गावच्या हद्दीत कुंपण उभारल्याने शेतरस्ते बंद झाले आहेत. त्याचबरोबर ऊस पिकाच्या वाहतुकीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.