गढूळाचं पाणी कशाला ढवळीलं?; कोयनेच्या पाण्यावरुन गदारोळ!

कोयनेच्या पाण्याने बदलला रंग; पाणी शुध्दीकरणाचा प्रकल्पही कुचकामी
Koyna Dam
Koyna Damesakal

कोयनानगर (सातारा) : इमा आपत शिवतम्.., इमा सर्वस्व भेषिजी., इमा राष्ट्रस्यवर्धिनी...! असे अत्यंत पवित्र व राष्ट्रवर्धिनी असणारे कोयनेचे (Koyna Dam) शुभ्र पाणी गढूळाचे पाणी झाले आहे. पाण्याचा अचानक रंग बदलण्यावरुन गदारोळ चालला असून अकारण कोयनेच्या पाण्याला बदनाम केले जात आहे. कोयनानगर येथे तर पाणी शुध्दीकरणाचा प्रकल्प कुचकामी ठरल्याने कोयनावासियांना शुध्द पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात (Heavy Rain) भटकंती करावी लागत आहे. धरण परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या भूस्खलनाने कोयना धरणातील पाण्याची जागा गाळाने घेतली आहे. गाळयुक्त झालेल्या कोयना धरणात गाळ किती व पाणीसाठा किती? हा संशोधनाचा विषय ठरला आहे.

Summary

कोयना धरण पात्रात डोंगररांगावरून मोठ्या प्रमाणात दगड-माती वाहून आली आहे.

मुसळधार पावसाचे आगार असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जुलै महिन्यात झालेल्या रौद्र स्वरुपाच्या पावसामुळे कोयना धरणांतर्गत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. कोयना ते महाबळेश्वर असे विशाल कोयना धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे. कोयना धरण पात्रात डोंगररांगावरून मोठ्या प्रमाणात दगड-माती वाहून आली आहे. दगड-माती वाहून आल्याने कोयनेच्या पाण्याने रंग बदलला आहे. शुभ्र असणारे कोयनेचे पाणी माती मिश्रित गढूळ झाले आहे. राज्यात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले आहे. त्या ठिकाणी माती मिश्रित पाणी येत आहे. सातारा जिल्ह्यातील उरमोडी धरणाच्या पाण्याने रंग बदलला आहे.

Koyna Dam
वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा आंदोलन

१०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणातील ५.१२ टीएमसी पाणीसाठा हा मृत म्हणून जाहीर आहे. धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मोठ्या प्रमाणात भूस्खलनाने गाळाची टक्केवारी व प्रमाण वाढले आहे. धरणात ५ टीएमसी गाळ असता, तर पाण्याचा रंग बदलला नसता. धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून धरणातील पाण्याची जागा गाळाने घेतली असल्याने धरणातील पाण्याचा रंग बदलला आहे. कोयना धरण गाळयुक्त असून धरणातील या गाळाचे सर्वेक्षण होवून यातून गाळाचे व पाण्याचे प्रमाण जाहीर करावे.

Koyna Dam
शेतकऱ्यांच्या मुलांना वाऱ्यावर सोडणार नाही : शंभूराज देसाई

कोयना धरण परिसरात प्रचंड प्रमाणात वृक्षतोड झाल्यामुळे कोयनेत गढूळाचे पाणी येत असल्याचा जावईशोध शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी करुन या प्रश्नी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com