

Satara
esakal
सातारा: "देशात एक भारतीय जनता पक्ष खंबीरपणे काम करत असताना, दुसऱ्या कॉक्रोच जनता पक्षाची अजिबात आवश्यकता नाही. अर्थात, लोकशाहीत प्रत्येकाला पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांनी गोरगरिबांच्या प्रश्नांवर आवाज उठवावा, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला, तसेच मोदी सरकारमध्ये काम करताना खासदार उदयनराजे भोसले यांच्या साथीमुळेच मला सत्ता आणि पद मिळाले असून, रिपाइं त्यांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहील," अशी ग्वाही त्यांनी दिली.