

Maharashtra Unveils Sahyadri Tiger Movement Plan, Relief for Local Villages
sakal
कऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या नव्या भ्रमण मार्ग (कॉरिडोर) आराखड्यात सातारा, सांगली जिल्ह्यांतील कोणत्याही गावांचा समावेश केला नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तिलारी, आंबोली-दोडामार्ग, चंदगड, आजरा-भुदरगड, गगनबावडा, पन्हाळगड, मसाई पठार, विशाळगड संवर्धन राखीव क्षेत्र, तसेच राधानगरी व दाजीपूर अभयारण्यांचा या आराखड्यात समावेश केला आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात वाढ झाली नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.