PM Narendra Modi
esakal
दहिवडी : भारताच्या इतिहासात आजपर्यंत ग्रामपंचायतीला कधीही दिलं नव्हतं तेवढं म्हणजे पाच कोटी रुपयांचे बक्षीस मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानातील (CM Samruddha Panchayatraj Abhiyan) विजेत्या ग्रामपंचायतीला मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासोबत चहा पिण्याची संधी मिळणार आहे. या अभियानात पहिल्या क्रमांकाचं गाव म्हणून आंधळीचं नाव पुकारल्यावर मला जास्त आनंद होईल, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केले.