
सातारा : जिल्ह्यातील निराधारांच्या योजनांचे पैसे थेट बॅंक खात्यावर जमा केले जात असले, तरी अनेकदा केवायसी पूर्ण नसलेल्या लाभार्थ्यांना पैसे मिळण्यात अडचणी येत आहेत. सध्या ९२७ लाभार्थ्यांचे आधार केवायसी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांचे पैसे खात्यावर जमा होत नाहीत. यातील बहुतांशी लाभार्थी इतर जिल्ह्यात राहात असल्याने त्यांचा संपर्कही होत नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.