What caused the Satara farm fire?
esakal
खटाव (सातारा) : येथील धारपुडी शिवारात भीषण आग लागून शेतकरी मोहन घाडगे यांची तीन एकरांवरील सीताफळाची बाग पूर्णपणे जळून खाक झाली. सुमारे २२०० झाडांची, पाच वर्षांच्या अथक परिश्रमातून उभी राहिलेली ही बाग काही क्षणांत भस्मसात (satara farm fire custard apple orchard loss) झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. कष्टाने फुलवलेली बाग काही क्षणांत राखेत परिवर्तित झाल्याने शेतकरी कुटुंबाच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले होते.