शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Farmer Crisis in Satara: पश्चिमेकडील तालुक्यात शेतीचे १०० हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सध्या नुकसानीची पाहणी सुरू असून, पावसाचा जोर ओसरल्यानंतर पंचनामे केले जाणार आहेत. घेवडा, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तसेच बाजरी, मका, आले, हळद या पिकांना फटका बसल्याचे चित्र आहे.
Heavy rains wreak havoc in Satara; Kharif crops on 100 hectares destroyed, leaving farmers in despair.
Heavy rains wreak havoc in Satara; Kharif crops on 100 hectares destroyed, leaving farmers in despair.Sakal
Updated on

सातारा: जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका पाटण, कोरेगाव, सातारा, कऱ्हाड, वाई, महाबळेश्वर तालुक्यांतील शेती पिकांना बसला आहे. पश्चिमेकडील तालुक्यात शेतीचे १०० हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सध्या नुकसानीची पाहणी सुरू असून, पावसाचा जोर ओसरल्यानंतर पंचनामे केले जाणार आहेत. घेवडा, कांदा, सोयाबीन, भुईमूग, तसेच बाजरी, मका, आले, हळद या पिकांना फटका बसल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com