
कृष्णा कारखान्याच्या सत्तेसाठी विरोधक आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्याची टीका अतुल भोसले यांनी केली.
कऱ्हाड (जि. सातारा) : कृष्णा कारखान्याच्या सत्तेसाठी विरोधक आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. मात्र, सत्तेत असताना त्यांनी कारखान्यात काय दिवे लावले, याचे आत्मपरीक्षण करावे, असे प्रतिपादन कृष्णा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी केले.
यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याच्या वारुंजी व पार्ले परिसरातील सभासद संपर्क बैठकीत ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक धोंडीराम जाधव, धनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, माणिकराव पाटील, प्रफुल्ल पाटील, दादासाहेब मेजर, हरिभाऊ पाटील, रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, राहुल पाटील, बाबासाहेब नलवडे उपस्थित होते.
खून, मारामारी, घरफोडीतील 18 गुंड तडीपार; साताऱ्यात पोलिस अधीक्षकांची 4 टोळ्यांवर धडाकेबाज कारवाई
श्री. भोसले म्हणाले, "कृष्णा कारखान्याने गेल्या 5 वर्षांत 3 हजार रुपयांहून अधिक दर दिला आहे. पाच वर्षांत साखर उतारा सर्वाधिक राहिला आहे. शेतकऱ्यांच्या बिलातून कोणतीही कपात न करता कारखान्याचा विस्तार केला गेला. ज्यामुळे आज कृष्णा कारखाना 9000 हजार मेट्रिक टनापर्यंत गाळप करतो. भविष्यात 12 हजार मेट्रिक टन गाळप क्षमता करण्याचे नियोजन आहे. मागील संचालक मंडळाने कर्जाचा डोंगर उभा केला. त्यांच्या काळात तोडणी वाहतुकीची थकबाकी कोट्यवधी रुपयांची होती; पण डॉ. सुरेशबाबांच्या कार्यकाळात एक रुपयाही थकबाकी नाही.'' या वेळी प्रकाश पाटील, प्रमोद पाटील, तानाजी नलवडे, धोंडीराम निकम, तुकाराम जाधव, संभाजी नलवडे, आनंद नलवडे, भिकाजी पाटील, गोरख नलवडे, महेश पाटील, सयाजी पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संपादन : बाळकृष्ण मधाळे