दिलासादायक! खटावसाठी वरदान ठरलेल्या नेर धरणातून सोडले पाणी; बळीराजा झाला खुश

Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News

विसापूर (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यासाठी वरदान ठरलेल्या ब्रिटिशकालीन नेर धरणातून उन्हाळी हंगामासाठी नुकतेच पाणी सोडण्यात आले. सध्या धरणामध्ये 75 टक्के पाणीसाठा असल्याने एक महिना सलग पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

नेर धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन आणि सर्व कालव्यांची दुरुस्ती करूनही रब्बी हंगामासाठी पाणी मागणी अर्ज आले नाहीत. आता उन्हाळी हंगामासाठी मात्र शेतकऱ्यांनी अर्ज भरून पाण्याची मागणी केली आहे. त्यानुसार सोमवारी सायंकाळी नेर धरणातून थेट येरळा नदीत, तसेच नेर मुख्य कालव्यातून राम ओढा आणि खातगुण येथील नदीवरील बंधाऱ्यात पाणी सोडण्यात आले आहे. या सोडलेल्या पाण्याचा नेर, पुसेगाव, काटकरवाडी, खातगुण, भांडेवाडी, खटाव, सिध्देश्वर कुरोली आणि भुरकवडी या भागातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. 

अर्ज भरण्याचे आवाहन 

उन्हाळी हंगामासाठी नेर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. सोडलेल्या पाण्याचा लाभ बागायती क्षेत्राला होणार आहे. विहिरींची पाणीपातळी वाढणार आहे. येरळा नदीकाठच्या गावांमधील शेतकऱ्यांनी अधिकाधिक पाणी मागणी अर्ज भरून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते आणि पाटबंधारे विभागाने केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com