
रहिमतपूर (जि. सातारा) : येथील परिसरातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास तीन महिने होत आले आहेत. मात्र, ऊसतोड कामगारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याने कारखान्याला ऊस जाणार कधी, या भीतीने कारखान्याचे विविध पदाधिकारी, राजकीय नेते, चिटबॉय, टोळी मुकादम यांच्याकडे ऊस घालवण्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट सुरू झाली आहे.
येथील परिसरातील लाभक्षेत्रातील ऊस सह्याद्री सहकारी साखर कारखाना, वर्धन ऍग्रो, जरंडेश्वर, जयवंत शुगर व इतर साखर कारखान्यांकडे जातो. परंतु; सध्या ऊसतोडणी मजुरांचा पुरवठा कमी प्रमाणात कमी झाल्याने ऊसतोडीचा वेग मंदावला आहे. वेळेवर ऊस जाणार नसल्याची चाहूल शेतकऱ्यांना झाल्याने ऊस घालवण्यासाठी त्यांनी विविध पदाधिकाऱ्यांकडे पायपीट सुरू केली आहे. या वर्षी पावसाचे प्रमाणही जास्त झाल्याने जवळपास 50 टक्क्यांपेक्षा जास्त उसाला तुरे येऊ लागले आहेत. तुरे येऊन जास्त दिवस झाल्यास ऊस पोकळ होऊन उसाच्या वजनात घट होत असून त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर कारखान्याला ऊस घालवण्याचे संकट भेडसावू लागले आहे. ऊस घालवण्यासाठी शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने ऊसतोडीसाठी ऊसतोड कामगार जवळपास एकरी तीन हजार रुपये, तसेच वाहने शेतातून बाहेर काढण्यासाठी वेगळे पैसे शेतकऱ्यांकडून वसूल करत आहेत. ऊस लागणीपासून ऊस गाळपाला जाईपर्यंत कराव्या लागलेल्या कसरतीने शेतकऱ्यांना गोड ऊस काही गोड वाटेना झाला आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.