
सातारा : ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीतील अर्ज माघार घेण्याची शेवटची मुदत आज (सोमवार) दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. त्यानंतर निवडणुकीतील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अर्ज माघारीनंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द होणार असून तीननंतर चिन्ह वाटप होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जिल्ह्यात 879 ग्रामपंचायतींसाठी 7 हजार 264 सदस्यांची निवड होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ता. 23 ते 30 डिसेंबरपासून सुरू झाली होती. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी यंदा निवडणूक आयोगाने उमेदवारांचा अर्ज ऑनलाइन सादर करणे बंधनकारक केले होते. मात्र, सततचा सर्व्हर डाउन होत तांत्रिक अडचणींमुळे निवडणूक आयोगाने शेवटच्या दिवशी ऑफलाइन अर्ज सादर करण्यास परवानगी देत अर्ज भरण्याची वेळ साडेपाच वाजेपर्यंत वाढवली होती. मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज आल्याने माघार घेताना गावपातळीवर चढाओढ सुरू झाली असून अर्ज काढून घेण्यासाठी अनेक उमेदवारांच्या मनधरणी सुरू असल्याचे चित्र आहे.
निवडणुकीसाठी 190 चिन्हांची यादी
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने 190 चिन्हांची यादी प्रसिध्द केली आहे. त्यामध्ये रिक्षा, शिट्टी, बॅट, कपबशी, फुगा, सफरचंद, पतंग, रोडरोलर, इस्त्री व इतर चिन्हांचा समावेश केला आहे. तर, पेनड्राइव्ह, सीसीटीव्ही व रिमोट या चिन्हांचा नव्याने समावेश केला आहे. निवडणुकीत बहुतांश खेळ चिन्हांवर आधारित असल्याने पारंपरिक चिन्हांबरोबर मतदारांना आकर्षित करण्यासाठी नव्या चिन्हांनाही उमेदवार व कार्यकर्ते पसंती देण्याची शक्यता आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.