दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला 'वंचित'चा पाठिंबा; केंद्र सरकारविरोधात साताऱ्यात धरणे

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला 'वंचित'चा पाठिंबा; केंद्र सरकारविरोधात साताऱ्यात धरणे

सातारा : कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवित केंद्र सरकारविरोधात आज वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे धरली.
 
यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, श्रीरंग वाघमारे, शशिकांत खरात, बाळकृष्ण देसाई, गणेश कारंडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र सरकारने शेतकरी संघटनांशी चर्चा न करता कृषीविषयक कायदे मंजूर केले आहेत. या कायद्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागणार असून आर्थिक स्थिती डबघाईला येणार आहे. केंद्र सरकारने कृषी कायदा करुन खासगीकरणाचा घाट घातल्याचे दिसून येत आहे. या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी रस्त्यावर उतरुनही सरकारने दुर्लक्ष केले आहे. या उलट आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्र सरकारविरोधात धरणे धरल्याचे वंचित बहुजन आघाडीने पत्रकाद्वारे सांगितले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com