काळकोठडीतील दुराव्याला मिळाला दोन महिन्यांनी आधार

काळकोठडीतील दुराव्याला मिळाला दोन महिन्यांनी आधार

सातारा : कैद्यांना नातेवाईकांशी बोलण्यासाठी जिल्हा कारागृहात फोनची यंत्रणा उभी करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या प्रसाराच्या शक्‍यतेमुळे गेल्या दोन महिन्यांपासून नातेवाईकांशी बोलणे न झाल्यामुळे मानसिक तणावात असलेल्या कैद्यांना दिलासा मिळाला आहे. 

लॉकडाउन घोषित केल्यामुळे नागरिकांना अत्यावश्‍यक सेवा वगळता अन्य कारणासाठी बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली होती. शासकीय कार्यालये बंद करण्यात आली होती. न्यायालयाच्या कामकाजाबाबतही त्यात निर्णय झाला. न्यायालयामध्ये केवळ जामीन व इतर तातडीची काही कामेच सुरू ठेवण्यात आली
होती. त्याचा साहजिक परिणाम अन्य खटल्यांच्या सुनावणीवर झाला. फौजदारी व दिवाणी सर्वप्रकारचे खटल्यांचे कामकाज थांबले. तसाच तो परिणाम कारागृहातील कैद्यांच्या जीवनावरही झाला.

राज्यातील कारागृहांची कैदी ठेवण्याची क्षमता व प्रत्यक्ष कैद्यांची संख्या यात मोठा फरक आहे. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त कैदी कारागृहातील बराकींमध्ये ठेवावे लागतात. तशीच काहीशी स्थिती जिल्हा कारागृहातही आहे. त्यामुळे एखाद्या कैद्याला लागण झाल्यास ती कारागृहातील अन्य कैद्यांना, तसेच जेल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही होण्याचा धोका होता. तसा धोका जिल्हा कारागृहात पुण्यावरून आलेल्या कैद्यांना बाधा झाल्याने निर्माण झाला होता; परंतु कारागृह व्यवस्थापनाने सुरवातीपासून त्यांना स्वतंत्र ठेवले होते. त्यानंतर त्यांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे कारागृह बाधित होण्याचा धोका टळला. 

हीच शक्‍यता गृहीत धरून संभाव्य धोक टाळण्यासाठी कारागृहामध्ये काही निर्बंध आणण्यात आले. त्यातील एक भाग म्हणजे कैद्यांना कारागृहातून खटल्यांच्या सुनावणीच्या तारखांना बाहेर नेणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. कारागृहामध्ये कैद्यांना नातेवाइकांना भेटण्याची संधी उपलब्ध करून दिलेली असते. नातेवाईकांशी बोलल्यामुळे त्यांचे मन हलके होते. त्यांची मानसिक स्थिती चांगली राहते. त्यामुळे त्यांचे कारागृहातील वर्तन चांगले राहण्यास मदत होते; परंतु जिल्हा, तसेच  परजिल्ह्यातून नातेवाईक आल्यास त्यांच्या माध्यमातूनही कोरोना संसर्गाचा प्रसार होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे कारागृहातील बंदी भेटीही रद्द करण्यात आल्या होत्या.

त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून कैद्यांना नातेवाइकांशी बोलता आले नव्हते. त्यातच कारागृहातच बाधित सापडल्यामुळे कैदीही तणावात होते. नातेवाइकांनाही आपल्या संबंधिताची परिस्थिती काय आहे हे समजत नव्हते. अशा परिस्थितीत कैद्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी कारागृह व्यवस्थापनाने चांगला निर्णय घेतला. त्यानुसार कैद्यांना नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी फोनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या माध्यमातून आठवड्यातून एकदा कैद्यांना नातेवाइकांशी बोलण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे कैद्यांना, तसेच नातेवाइकांनाही एकमेकांची ख्यालीखुलाशी कळत आहे. त्यामुळे त्यांचा मानसिक ताण हलका होण्यास मदत झाली आहे. 


मानसिक स्वास्थ टिकेल 

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नातेवाईक भेटी बंद होत्या. त्यामुळे कैद्यांना त्यांची संपर्क साधण्यासाठी फोनची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ व्यवस्थित राहण्यास मदत होत असल्याचे कारागृह अधीक्षक गोविंद राठोड यांनी सांगितले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com