कतारमध्‍ये अडकलेले 32 भारतीय अखेर परतले मायदेशी

दोहा कतार
दोहा कतार

कऱ्हाड (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यातील नोकरीनिमित्त कतार येथे गेलेले 32 नागरिक लॉकडाउन लागल्यावर तेथेच अडकले होते. त्या अडकलेल्या नागरिकांनी भारतात परतण्यासाठी खासदार पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर खासदार पाटील यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तत्काळ पत्र लिहिले. पाटण तालुक्‍यातील त्या नागरिकांना मायदेशात परत आणण्यासाठी विनंती केली. खासदार पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे. कतारमध्ये अडकलेले पाटण तालुक्‍यातील 32 नागरिक शनिवारी मुंबईत पोचले. त्यांना घेऊन येणारे विमान मुंबई विमानतळावर पोचल्यावर त्यांची आरोग्य तपासणी झाली आहे. आता त्यांचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले असून, सुरक्षिततेच्या कारणावरून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले आहे. 

दोहा कतार विमानतळावरून सातारा जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील ज्या कामगार मंडळींना परत आणले व विलगीकरण कक्षात राहिले आहेत, त्या सगळ्यांचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया खासदार पाटील यांनी दिली. 

खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्या नागरिकांना परत आणण्यासाठी सहकार्य केले. त्यामुळे लोकांची तिथून येण्याची उत्तम व्यवस्था झाली. घरी पोचण्याचा आनंद त्या नागरिकांनी व्यक्त केला. आपले बांधव भारतात सुखरूप पोचल्याचा मलाही मनस्वी आनंद आहे. या कार्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचा आभारी आहे. 
-खासदार श्रीनिवास पाटील 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com