वनवास संपणार : ४६ दिवसानंतर महाराष्ट्रातील 'हे' गाव कन्टेनमेंटमुक्तीकडे

वनवास संपणार : ४६ दिवसानंतर महाराष्ट्रातील 'हे' गाव कन्टेनमेंटमुक्तीकडे

वहागाव (ता. कऱ्हाड) : कोरोनाच्या सर्वाधिक रुग्ण संख्येमुळे हॉटस्पॉट बनलेले कऱ्हाड तालुक्यातील वनवासमाची सध्या कोरोनामुक्त झाले. आता वनवासमाची गाव कन्टेनमेंट झाेन मुक्तीच्या मार्गावर आहे. आरोग्याच्या दृष्टीने येथील स्थिती नियंत्रणात आली आहे. उद्या (शनिवार) पासून येथील पोलिस बंदोबस्त हटवण्यात येणार आहे अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. ग्रामस्थांच्या सोयी-सुविधांसाठी गाव कंटेनमेंटमुक्त करण्यात येणार आहे. त्यामुळे वनवासमाचीची वनवास संपणार असून गावकरी तब्बल दिड महिन्यानंतर माेकळा श्वास घेणार आहे. 

कोरोना आजाराने थैमान घातले आहे. कर्‍हाड तालुक्यातील बाबरमाची येथील कोरोना संशयित रुग्णाच्या संपर्कात आल्याने वनवासमाची-खोडशी येथे कोराेनाची लागण झाली. २१ एप्रिल रोजी कोरोनाची वनवासमाचीत एन्ट्री झाली. अन् माचीसह परिसरात खळबळ उडाली. त्यावेळी आरोग्य विभागासह संबंधित पथक वनवासमाची गावात पोहोचले. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून तात्काळ वनवासमाची गावच्या मुख्य प्रवेश मार्गासह, गावातील अंतर्गत सर्व रस्ते, दुकाने बंद करुन गाव सील केले. बघता बघता गावातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. १५ दिवसांत तेथील कोरोनाच्या रुग्ण संख्या ३९ वर जाऊन पोचली. त्याला नियंत्रणात आणण्याचे आव्हान वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार व त्यांच्या पथक सातत्याने पेलेले. त्यांनी घराघरात केलेली जागृती व अत्यावश्यक उपाययोजनांमुळे कडवे आव्हान हळूहळू ग्रामस्थांच्या सहकार्याने सुटत गेले. वनवासमाचीची वाढती संसर्ग साखळी तोडण्यासाठी गावातील २४७ लोकांची स्वॅब तपासणी झाली, १९८ लोकांना क्वारंटाईन केले गेले. 


वनवासमाचीतील बाधितांवर कर्‍हाडच्या कृष्णा, सह्याद्री व उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. आरोग्य विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर वनवासमाची गाव ३५ दिवसानंतर अखेर कोरोनामुक्त झाले. वनवासमाची गाव सुमारे ४६ दिवसांपासून पूर्णतः सील आहे. तेथील सामान्य जीवनमान विस्कळीत झाले आहे. गावातील लोक गावातच अडकल्याने हातावर पोट असणाऱ्या अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. मित्र, नातेवाईकांसह, प्रशासन व लोकप्रतिनिधींनी गावातील ग्रामस्थांना वेगवेगळ्या पध्दतीने मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गाव सावरले. अन् कोरोनामुक्तही झाले. कोरोनामुक्तीनंतर गाव पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे ते उद्या (शनिवारी) कन्टेनमेंट मुक्त होत आहे. सर्वच उद्योगधंदे, कामे लॉडाऊनमुळे बंद असल्याने लोकांसमोर अडचणींचा डोंगर असला तरी कोरोमुक्तीनंतर मोकळा श्वास घेणार असल्याचे समाधनही दिसते आहे. कोंडवाड्यात कोंडल्या प्रमाणे गावात निर्माण स्थिती जाणार अशून गाव आता मोकाळ श्वासस घेणार आहे.
 

कोरोना आजारामुळे राज्यात हॉटस्पॉट बनलेल्या वनवासमाचीतील स्थिती आता नियंत्रणात आली आहे, गावातील संभाव्य धोका टळला आहे. त्यामुळे गावातील पिठाच्या गिरणीसह, दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. शनिवारपासून गाव कंटेनमेंटमुक्त होणार आहे. 

उत्तम दिघे, प्रांताधिकारी, कर्‍हाड


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com