Maharashtra Politics : फडणवीसांना विचारल्याशिवाय एकही निर्णय नाही; एकनाथ शिंदे यांनीच महायुती भक्कम केली; मंत्री शंभुराज देसाईंचा ठाम प्रतिवाद!

Shambhuraj Desai On Mahayuti Alliance : भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांच्या 'भाजप देवाभाऊमय आहे' या वक्तव्यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी जोरदार प्रहार करत, एकनाथ शिंदे यांच्या २०२२ च्या उठावामुळेच भाजपला सत्तेत स्थान मिळाले आणि महायुती भक्कम झाली याचे भान लोढा यांनी ठेवावे, असे सुनावले.
Minister Shambhuraj Desai Slams Mangalprabhat Lodha's 'Devabhau' Comment

Minister Shambhuraj Desai Slams Mangalprabhat Lodha's 'Devabhau' Comment

sakal

Updated on

कऱ्हाड : भाजप देवाभाऊमय आहे, तर महाराष्ट्रातील इतर पक्ष कसे चालतील हे देवाभाऊ ठरवतात असे वक्तव्य भाजप नेते मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी जोरदार प्रहार केला. एकनाथ शिंदे यांनी २०२२ ला जी उठावाची भूमिका घेतली त्यामुळे भाजप सत्तेत आले आणि चांगला वाटा मिळाला. २०१९ मध्ये आम्हाला सत्तेतून बाहेर जाण्याची गरज नव्हती. शिवसेना भाजप युती भक्कम करण्यासाठी आम्ही सत्तेतून बाहेर पडलो. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात महायुतीला यश मिळाले आणि भाजप ताकदवान झाले याचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी गांभीर्याने विचार करावा असे सुनावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com