कऱ्हाड : भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते; परंतु लाडक्या बहीण योजनेमुळे राज्य सरकारवर ४० हजार कोटींचा आर्थिक ताण आला आहे. महाराष्ट्र हे आर्थिक शिस्त पाळणारे राज्य असून, वर्षभरात सरकारचे उत्पन्न वाढल्यानंतर त्या वेळच्या आर्थिक परिस्थितीनुसार कर्जमाफीचा निर्णय सरकार घेईल, असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.