
सातारारोड : जलप्रदूषण कमी करण्याकरिता व उपाययोजना करण्याकरिता कार्य दल (टास्क फोर्स) गठित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याचे नमूद करत कृष्णा नदीमध्ये एका कारखान्याद्वारे दूषित पाणी सोडले जात असल्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार संबंधित कारखान्यास मंडळाकडून गेल्या २५ एप्रिलला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.