साता-याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी धाडले तहसीलदारांना आदेश

साता-याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी धाडले तहसीलदारांना आदेश

सातारा : ऑक्टोंबर 2020 मध्ये अतिवृष्टी व पूरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबत संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहे.

शेतीपिकांच्या नुकसानीबाबत संयुक्त पंचनामे करुन 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीबाबात बाधित शेतकऱ्यांना 13 मे 2015 च्या शासन निर्णयात विहित केलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेला एकत्रित प्रस्ताव प्रपत्र अ,ब,क,क, ड मध्ये अहवाल सादर करावा.

भीमा नदीवरील बेगमपूर पूल पाण्याखाली; सोलापूर-मंगळवेढा वाहतूक ठप्प 
 

येणाऱ्या प्रस्तावामध्ये एकाच लाभार्थ्यासाठी मदतीची द्विरुक्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच शेतकऱ्यांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करावयाचा असल्याने अहवाल तात्काळ सादर करावा, असेही आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहे.

सावधान! चक्रीवादळ सातारा-वडूजमार्गे जाणार मुंबईला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com