

“Minister Shivendraraje Bhosale addressing the Satara gathering — says election decision will be made at the right time.”
Sakal
सातारा : सर्वांच्या संघटितपणामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. कधीकाळी राष्ट्रवादीचा गड असणारा जिल्हा आता भाजपचा बालेकिल्ला झाला आहे. ही कोणा एकाची किमया नसून त्यात सर्वांचे योगदान आहे. यापूर्वी आपण कधीही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवल्या नव्हत्या. यंदाच्या निवडणुकांबाबत वरिष्ठ मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दोन्ही बाजूचे सर्व जण एकत्र बसून निर्णय घेतील. निवडणुका कशा लढायच्या याबाबतचा निर्णय योग्यवेळी होईल, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सातारा येथील मेळाव्यात केले.