ST Bus
ST Busesakal

'लालपरी'कडे प्रवाशांची पाठ; 'महामंडळा'च्या नुकसानीला जबाबदार 'कोरोनाची लाट'

सातारा : गेल्या महिनाभरापासून कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावाने जिल्हा लॉकडाउन (Lockdown) होता. परंतु, मागील आठवड्यापासून कोरोनाची संख्या काही प्रमाणात नियंत्रणात आल्याने प्रशासनाने लॉकडाउन शिथिल करत एसटी (ST Bus) वाहतूकही सुरू केली आहे. मात्र, प्रवाशांनी एसटी प्रवासाकडे पाठ फिरविल्यामुळे महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नाला मोठा फटका बसत आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी आगारनिहाय जनजागृती करणे, पर्यवेक्षक व लेखनिक शाखेतील कर्मचाऱ्यांना गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांना मदत करणे व इतर नियोजन राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation) करणार आहे. (The Lack Of Passengers Has Caused Financial Loss To The Maharashtra State Road Transport Corporation)

Summary

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे थैमान सुरू झाले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर एसटी वाहतूक सुरू करण्यात आली होती.

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाचे थैमान सुरू झाले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर एसटी वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र, यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर पुन्हा एप्रिल महिन्याच्या मध्यापासून लॉकडाउन करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यापासून कोरोना नियंत्रणात आल्याने दोन दिवसांपासून एसटी सुरू झाली आहे. मात्र, बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी अद्यापही कमी असल्याने महामंडळाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ST Bus
ठरलं तर! काेविडची साखळी ताेडण्यासाठी 22 जूनपर्यंत लाॅकडाउन

दरम्यान, प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी विभाग नियंत्रकांनी सर्व आगारनिहाय तीन दिवसांनी भेट देऊन आढावा घ्यावा. याचबरोबर कोरोनाच्या काळात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक आगारात एसटी बस गेल्यानंतर सॅनिटायझिंग करण्यात यावे. तसेच, लांब पल्‍ल्यांच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात. संचलनात सुस्थितीतील बस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध कराव्यात. विनावाहक विभागातील कर्मचारी वेळेत उपस्थित राहत नसल्यास कारवाई करण्याचा सूचना राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्य कार्यालयाने विभाग नियंत्रकांना देण्यात आल्या आहेत.

ST Bus
ठाकरे सरकार विराेधात डाॅक्टरांची एकजूट; दरपत्रकास विराेध

चार दिवसांत फेऱ्यांची संख्या ५० टक्के करणार

जिल्ह्यातील ११ आगारांतून दैनंदिन काळात दररोज तीन हजारांहून अधिक फेऱ्या सुरू असतात. मात्र, एसटी वाहतूक सुरू झाल्यानंतर ३० टक्के फेऱ्या सुरू ठेवण्यात आल्या आहेत. तर, येत्या चार दिवसांत फेऱ्यांची संख्या ५० टक्के करण्यात येणार आहे. तसेच, मुख्य बस स्थानकातून लांब व मध्यम पल्‍ल्याच्या सद्य:स्थितीत ९० टक्के फेऱ्या सुरू असल्याची माहिती सातारा आगार व्यवस्थापनाने दिली आहे.

The Lack Of Passengers Has Caused Financial Loss To The Maharashtra State Road Transport Corporation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com